विश्वासघात.

        काल नविन बरेच दिवसांनी भेटला. म्हणाला चेन्नईला होतो कंपनीच्या कामासाठी. कालच Bombayला परतलो. त्याचे Bombay ऐकून माझा स्क्रू ढिला झाला. त्याला म्हटले कारे तुम्ही चेन्नई म्हणता तर मुंबई म्हणायला काय होते.
        तर तो म्हणाला चेन्नईत मद्रास म्हणणे म्हणजे मारच खावा लागेल.
        त्याला म्हणालो तु मुंबईतच हिम्मत करू शकतोस Bombay म्हणायची.
तर त्याने मलाच मराठी माणसावर मोठ्ठे भाषण दिले. मराठी माणसाने काय करायला हवे या विषयावर.
        खरच मराठी माणसाचे कुठे चुकते ?
        कां आपण मुंबई म्हणू शकत नाही ?  
        आपले मराठी रिक्षावाले कुठेही नेत नाहीत ?
        आपली दुकाने  १ ते ४ बंद ठेवायलाच हवीत कां ?
        आपण आपल्या माणसांना कधि न्याय देणार ? 
आणि हो,
        मराठी माणुस मराठी माणसाचाच विश्वासघात करणे कधि बंद करणार ?
 
मी या प्रश्नांची उत्तरे शोधतोय.