विश्वासघात.

        काल नविन बरेच दिवसांनी भेटला. म्हणाला चेन्नईला होतो कंपनीच्या कामासाठी. कालच Bombayला परतलो. त्याचे Bombay ऐकून माझा स्क्रू ढिला झाला. त्याला म्हटले कारे तुम्ही चेन्नई म्हणता तर मुंबई म्हणायला काय होते.
        तर तो म्हणाला चेन्नईत मद्रास म्हणणे म्हणजे मारच खावा लागेल.
        त्याला म्हणालो तु मुंबईतच हिम्मत करू शकतोस Bombay म्हणायची.
तर त्याने मलाच मराठी माणसावर मोठ्ठे भाषण दिले. मराठी माणसाने काय करायला हवे या विषयावर.
        खरच मराठी माणसाचे कुठे चुकते ?
        कां आपण मुंबई म्हणू शकत नाही ?  
        आपले मराठी रिक्षावाले कुठेही नेत नाहीत ?
        आपली दुकाने  १ ते ४ बंद ठेवायलाच हवीत कां ?
        आपण आपल्या माणसांना कधि न्याय देणार ? 
आणि हो,
        मराठी माणुस मराठी माणसाचाच विश्वासघात करणे कधि बंद करणार ?
 
मी या प्रश्नांची उत्तरे शोधतोय.
 
 
 
 

टकले मास्तर.

                            त्या बैठकीत "मराठी माणूस धंदा करू शकतो कां?" याविषयावरील चर्चा मुद्यावरून गुद्यावर आली. कारण होते टकले मास्तर. अतिशय प्रामाणीक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन ख्याती व तितकेच हटवादी.
                           खरेतर महिन्याचं सामान वाण्याकडून घेण्याऐवजी घाउक बाजारातुन आणुन वाटप केलेतर किती स्वस्त पडेल याविषयी मते जाणुन घ्यायला सगळे जमले होते व त्यातच मराठी माणसाने एखादे दुकान थाटावे यावर ती चर्चा घसरली. व मुद्दे सोडुन गुद्दे मधे आले.
                           त्यातच टकले मास्तर म्हणाले मी थाटतो दुकान बघुया तुमच्यापैकी किती जण माझ्याकडुन सामान घेतात.
                            मास्तरांनी दुकान थाटले. इतरांच्यातुलनेत स्वस्त व चोख सामान मिळते म्हणुन ख्याती मिळवण्यात मास्तर यशस्वी झाले. जुना लौकिक होताच, त्यात दुकानामुळे मास्तरांना गावच नाही तर आजुबाजूच्या खेड्यातुनही लोक ओळखू लागले.
                            मास्तरांनी एकाची चार दुकाने केली व आपला शब्द खरा केला.
                           आज मास्तर नाहीत. त्यांची मुलगी व भाचे दुकाने सांभाळतात. पण दुकाने ओळखली जातात टकले मास्तरांच्याच नावाने.