कवि आणी कविता.

                            माझा एक मित्र बरेच वर्षे माणसात होता. माणसात होता म्हणजे सामान्य माणसा सारखाच वागायचा. काही दिवसांपूर्वी त्याला कविता करायची उर्मी जागी झाली आता तो भेटेल त्याला त्याने केलेल्या कविता ऐकवत फिरतो.
                            बर कविता कशावर करावी याच अशा कविंवर बंधन नसते. त्यानेतर आपल्या बायको मुलांनाही सोडले नाही ! तेही त्याच्या कवितांचे विषय आहेत.
                            असाच परवा भेटला बरेच दिवसांनी. खरतर टाळणारच होतो मी त्याला पण....
                            त्याने मला विचारले अरे तुझ्याकडे थोडा वेळ आहे कां? मला तुझी थोडी मदत हवीय. मी म्हणालो ठिकाय थोडा वेळ द्यायला हरकत नाही. तर पठ्याने माझे ४ तास खाल्ले. नविन केलेल्या सगळ्या कविता ऐकवूनच मला सोडल.
                            त्याची एक कविता होती आमच्याच एका हल्लीच देवाघरी गेलेल्या सोबत्यावर, ज्याचे याचाशी कधिही जमले नाही त्याच्यावर......